Sunday 6 March 2022

दादोजी कोंडदेव ( ७ मार्च १६४९ )

 दादोजी कोंडदेव ( ७ मार्च १६४९ ) 

                     आज ७ मार्च . तर ७ मार्च १६४९ या दिवशी दादोजी कोंडदेव ह्यांचे निधन झाले.

दादोजी कोंडदेव हे कोण होते? 
   
               तर मित्रांनो, दादोजी कोंडदेव हे छत्रपती शहाजी राजे भोसले यांचे चाकर होते.दादोजी कोंडदेव यांचा जन्म १५७७ रोजी झाला.१६३६ पासून ते वयाच्या ७२व्या वर्षांपर्यंत ते शिवाजी महाराजांच्या जवळ होते.
दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक होते.
त्यांनी पुणे परगणा जहागीरीची देखेरेक करणारे सुभेदार पदाची चाकरी करत होते. ते शहाजी राजे भोसले यांचे चाकर होते. दादोजी कोंडदेव हे शिरूर येथील होते. 

                    दादोजी कोंडदेव हे  सिंहगडाचे किल्लेदारही
    होते. जिजाऊसाहेब व शिवाजीराजांना घेऊन पुणे जहागिरीत आले. तेव्हा जिजाबाई आणि शिवाजी राजे यांच्याकरिता दादाजी कोंडदेवाने पुण्यात लालमहाल नावाचा वाडा बांधला. ह्याच बरोबर शिवगंगेच्या काठी 
आंब्याची बाग लावून त्यांनी त्या बागेला शहाबाग असे नाव दिले. पुण्यापासून चार पाषाण म्हणून गाव आहे. तेथे दादोजीनी पेठ वसवून त्या गावचे नवे नाव ' पेठ जिजापुर' ठेवले. जिजाऊसाहेबांच्या खाजगी खर्चासाठी केळवडे व रांझे ही दोन गावे लावून दिली.
दादोजी कोंडदेव हे मलठण गावचे ते कुलकर्णी होते. यांचे मूळ आडनाव ' गोजिवडे ' असे होते. दादोजी आणि भोसले कुटुंबांचे संबध फार पूर्वीपासून होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे भोसले यांनी हिंगणी, बेरडी, देऊळगाव या गावांची पाटीलकी मिळविली होती. या गावांचा कुलकर्णी म्हणून दादोजी काम पहात असत. 

                      दादोजी कोंडदेव हे सुभेदार या नात्याने पुणे परगणा परिसरात दादोजीने दक्ष कारभाराने परिस्थितीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली. लोकांना सुरक्षित वाटण्यासाठी योग्य ते उपाय केले, निवाडे दिले, जमिनींचे मालकी हक्क निश्चित केले, जमिनींची प्रतवारी लावून मालिक अंबरची जमीन महसूल पद्धत आवश्यक त्या फेरबदलाने सर्व जहागिरीत लागू केली. सारा पिकांच्या उत्पन्नावर सारा निश्चित केला, शेती आणि बागाइतीला उत्तेजन दिले, तगाईच्या स्वरूपात शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली आणि शेतीव्यसायात सुधारणा व्हावी म्हणून काही वर्षे शेतसारा माफ केला. ही कामे/सेवा त्यांनी केली.
पुण्यातील आंबील ओढ्याला धरण बांधले. पुणे प्रदेशाच्या सुरक्षिततेची दादोजीने चोख व्यवस्था केली.
देशमुखीतील तंटे मोडून त्यांना स्वराज्याच्या कामगिरीत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. अनेक भांडणांचे निवाडे केले. दादोजी एक ब्राह्मण  त्याने केलेले निवाडे औरंगजेबासही मान्य झाले, असे पहिल्या शहाजी राजांने त्याच्याविषयी उद्गार काढले. 

                        दादोजी कोंडदेव ह्यांना शिवाजीराजे यांचे पालक आणि स्वराज्याच्या प्राथमिक अवस्थेतील मार्गदर्शक ह्या नात्याने महत्वाचे स्थान आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यास प्रारंभ होण्यापूर्वी दादोजी कोंडदेव  मरण पावले.
दादोजी कोंडदेव यांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी असे  पत्रात म्हटलं आहे की, "आमच्या वडिलांनी आम्हाला दादोजींकडे पाठवलं. आता ते निवर्तले आणि आम्ही पोरके झालो."  यावरून महाराजांच्या मनात दादोजींबद्दल काय भावना होती, हे निश्चित कळते.

                          _ एकता चौधरी

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...