सध्याच्या परीस्थितीत असंच चालू आहे, आज शिक्षण पण ऑनलाइन पध्दतीने सुरू आहे. आज मोबाईल शिवाय काही पर्याय नाही. आजकाल ऑनलाइन शिक्षण झाल्यामुळे असे कित्येक लोक आहे कि ज्यांची परिस्थिति बिकट आहे. त्यांच्याकडे मोबाईल नसुन सुध्दा दुसऱ्याचा मोबाईल हाताळून क्लासेस करत आहे,परंतु मोबाईल घेण्याची त्यांच्याकडे सोय नाही इवढे ऑनलाइन शिक्षण आज ह्यांनच्यापुढे महत्वपूर्ण झालेले दिसुन येत आहे. आणि काय तर प्रत्येक महिन्याला unlimited recharge, तर असो आज जी परीस्थितीत दिसुन येत आहे ती corona virus ह्या आजारांनमुळे.
इंटरनेट वर दिसुन आलेल्या छायाचित्रा मध्ये एक गरीब शेतकरी बाप आपल्या लेकाला ( मुलाला) सांगतांनी दिसुन येत आहे की, लेकरा आताच दुबार पेरणी झाली ऑनलाइन शिक्षणाले मोबाईल कुठून आनुन देवु? हे दु:ख तो स्वत:हा च्या मुलाला सांगतो आहे. आणि हे एका शेतकरी बापाच दु:ख आज मी ह्या लेखद्वारे तुमच्या समोर घेऊन आली आहे.
मित्रांनो, आजकाल शिक्षण पण खुप महत्वाचे झाले आहे. पण अशा कित्येक शेतकरी बापांनकडे शिक्षणासाठी मोबाईल आणि सोबतच unlimited recharge कुठून येणार, आणि वरुन त्याचसोबत शिक्षणाचा खर्च, ह्याच कारणामुळे कित्येक मुलांनी शिक्षण सोडले आहे आणि आज ते मुलं बाल मजदूरी करतांनी आढळून येत आहे.
लॉकडाऊनमुळे आज शेतात मजूर कामाला येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही आणि नेलेच बाजारात तर विकल्या जाईल हे सांगता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सोडून द्यावा लागत आहे. ग्रामीण भागातील बळिराजाची आज काय अवस्था झाली आहे.
ह्याच समस्या मुळे आज "धरीत्रीच्या कुशीमधीं तशीच बीयबियानं निजलीं आहे "
No comments:
Post a Comment