Saturday 23 April 2022

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक
आयुष्याच्या प्रवासात, 
जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक,

आपल्यकडे कसली तकरार न करणारा, 
जिवनातला खरा मित्र म्‍हणुन ओळखणारा म्‍हणजे पुस्‍तक, 
वाचताना बोटानी हळुच पान पलटनार, 
जगाला बदलून टाकणारं साधन एक पुस्तक, 

अभ्यासा च्या नवावर आपण ज्याच्याकडे वाळून पाहतो
कंटाळा येताच नजर चोरून जातो
तेच हे  पुस्तक,

वाचायची गोडी लावणारं, 
माणसाला हूशार बनवनारं, 
चुकीच्या पायवाटा वरुन
खरं अंतरंग दाखवनार, 
साधन म्हणजे पुस्तक.

तर मित्रांनो आज २३ एप्रिल "जागतिक पुस्तक दिन" या दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा......... 

_ एकता चौधरी

Wednesday 13 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर             

               भारतीय संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म भारतातील मध्यप्रांतात झाला होता. बाबासाहेब 14 एप्रील 1891 ला मध्यप्रदेशातील इंदौर जवळ महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले. जेव्हां आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचे वडिल इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणुक इंदौर येथे होती. 3 वर्षानंतर 1894 ला त्यांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रातील साता.यात स्थानांतरीत झाले. भिमराव आंबेडकर आपल्या आई वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. ते आपल्या कुटुंबांतील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळयांचे लाडके होते. भिमराव आंबेडकर
महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबधीत होते आणि त्यांचे मुळगांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे हे आहे, महार जातीतील असल्याने त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे. तरीही त्यांनी फार संघर्ष करून सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले. त्यांना शाळेत देखील जातीगत भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले त्यांच्या जातीच्या विदयाथ्र्यांना वर्गात बसण्याची, शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. शाळेचा चपराशी त्यांना वरतुन हातावर पाणी टाकुन पिण्यास देत असे, जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास देखील मिळत नसे. या सर्व अन्यायांना सहन करत देखील बाबासाहेब उच्चविद्याविभुषीत झाले.
                      डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या आयुष्यात खूप त्रास सहन केले पण त्याचा परिणाम त्यांनी कधीही आपल्या शिक्षणावर होऊ दिला नाही. ते दररोज १४ ते १८ तास अभ्यास सहजच करत असे. बडोद्याचे शाहू महाराजांनी त्यांना उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठविले.
बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. असे आख्यादित आहे की त्यांची वैयक्तिक लायब्ररी जगातील सर्वात मोठी लायब्ररी होती. आणि त्यात पुस्तकांची संख्या ५० हजारांपेक्षा देखील अधिक होती. 
आम्ही लहान होतो तेव्हा त्यांचा व ग्रंथपालाचा एक किस्सा ऐकला होता तो म्हणजे असा की, डाॅ. बाबासाहेब दररोज एका लायब्ररीत जात असे आणि तासंतास अभ्यास करत असे. एकदा ते दुपारच्या जेवणाच्या वेळी लायब्ररीत बसून भाकरी खात होते तेव्हा ग्रंथपालाने त्यांना बघितले आणि त्यांना चिडवले आणि टोमणा दिला की कॅफेटेरिया जाण्याऐवजी ते येथे लपून- छपून भोजन करत आहे. ग्रंथपालाने त्यांना शिक्षा करण्याची व त्याचे सदस्यत्व संपविण्याची धमकी दिली. ते ऐकून बाबासाहेबांनी त्यांची माफी मागितली आणि स्वतःच्या आणि आपल्या समाजाच्या संघर्ष आणि इंग्लंडमध्ये येण्याचे कारण सांगितले. तसेच दुपारच्या जेवणासाठी कॅफेटेरिया जाण्यासाठी आपल्याकडे पुरेसे पैसे नसल्याची प्रामाणिक कबुलीही त्याने दिली. हे ऐकल्यावर ग्रंथपाल म्हणाला, आजपासून आपण दुपारच्या जेवण्याच्या वेळी येथे न बसता माझ्यासोबतच कॅफेटेरियात येणार आणि मी माझे भोजन तुमच्याबरोबर वाटून खाणार! ग्रंथपाल एक यहुदी होता. आणि त्याचा या वागणुकीमुळे बाबासाहेबांच्या मनात यहुदींसाठी एक विशेष स्थान होते. आज हा लेख लिहत असतांना हा किस्सा आठवला म्हणून लिहावसा वाटला. आणि ह्यावरूनच कळते कि ते किती प्रामाणिक व अभ्यासू होते.

              तर मित्रांनो, आज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार कसा केला? 
 तर, त्यांनी 
'मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा बाबासाहेबांनी 1935 साली केली. हिंदू धर्मातील असमानतेवर आसूड ओढत अखेरीस 21 वर्षानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956.त्या दिवशी बाबासाहेब सकाळी लवकर उठले. कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर परिधान करून डॉ. आंबेडकर सकाळी श्याम हॉटेलमधून दीक्षाभूमीकडे निघाले. ते आणि त्यांच्या पत्नी माई 11 ऑक्टोबरलाच नागपुरात आले होते. नागपूर शहराच्या मधोमध असलेल्या दीक्षाभूमीत हजारोंचा जनसमुदाय जमला होता. बाबासाहेब आणि माई तिथे पोहोचून व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. तेव्हाचे सर्वांत वयोवृद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांना या कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात आलं होतं. व्यासपीठावरच्या एका टेबलावर बुद्धांची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती. त्याच्या बाजूंना दोन वाघ होते. व्यासपीठावर धर्मोपदेशक बसले होते. समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली. नंतर चार भिख्खूंनी बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून 'बुद्धं शरणं गच्छामि', 'धम्मं शरणं गच्छामि', 'संघं शरणं गच्छामि' असं म्हणवून घेतलं.जीवहत्या, चोरी, असत्य भाषण, अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहणार असे पंचशील म्हणवून घेतले. त्यानंतर बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या चरणी मस्तक ठेवून तीन वेळा वंदन केले. बुद्धमूर्तीला पुष्पहार वाहिला.
 हे झाल्यावर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित करण्यात आलं. त्याबरोबर 'बाबासाहेब आंबेडकर की जय', 'भगवान बुद्ध की जय' असा जयजयकार करण्यात आला आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले. 
       
                     हा सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की, "मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेलो नाही, मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन. बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन." त्यानंतर 'ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं रहावं', असं आवाहन त्यांनी जनसमुदायाला केलं. पाहता पाहता सगळे उभे राहिले. त्यांना पंचशील आणि बावीस शपथा म्हणावयास सांगितल्या. त्यादिवशी जवळजवळ तीन लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला,'  1955 सालानंतर बाबासाहेबांची तब्येत ढासळत चालली होती. कोणत्याच उपचारांचा त्यांना फायदा होत नव्हता. त्याच काळात 'बुद्ध आणि त्याचा धम्म' या पुस्तकाचे कामही सुरू होते. आपण हयात असतांनाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. जर सर्व अनुयायांनी धर्मांतर केलं नाही तर कसं करायचं, ही भीती एकाने व्यक्त केली, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, "आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही. ज्यांना माझ्याबरोबर धर्मांतर करायचं आहे त्यांनी ते करावं," आपली तब्येत खंगत चालली आहे, याची बाबासाहेबांना जाणीव होती. आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. धर्मांतर केल्यानंतर अवघ्या 50 दिवसांत त्यांनी प्राण सोडले. तर आज त्यांची जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

_ एकता चौधरी.

Monday 11 April 2022

नक्षत्र तारेंचे

  नक्षत्र तारेंचे
 दिसे किती शोभित

अंधार रात्रि रुप चंद्राचे 
दिसे किती शोभित

पडे रास चांदण्याची 
रात्र दिसे शोभित

 तारा शुक्रांचा
 दिसे किती शोभित 
अंधार रात्रि 

आंगन नटलेले चंद्रानी 
दिसे किती शोभित

नक्षत्र तारेंचे
 दिसे किती शोभित 

Friday 1 April 2022

गुढीपाडवा शाप कि नविन वर्षाची सुरूवात

गुढीपाडवा शाप कि नविन वर्षाची सुरूवात

                         महाराजांच्या मृत्यूचा आणि गुढी पाडव्याचा खरंच काही संबंध आहे का ? गुढीपाडवा हा कसा ब्राह्मणांचा सण आहे आणि शंभुराजांना मारून हा साजरा केला गेला हे दाखविण्यासाठी काही आरोप केले जातात. सर्वप्रथम केला जाणारा आरोप म्हणजे संभाजी महाराजांना औरंगजेबाने नव्हे तर ब्राह्मणांनी ठार केले, ब्राह्मणांनी मनुस्मृतीनुसार शंभुराजांना ठार केले, वर तुम्हाला हे सांगितले जाईल कि मनुस्मृती, अध्याय आठवा, श्लोक १२५/१२६ या नुसार शंभुराजांना मारले.  आणि काय ते म्हणतात, शंभुराजांना मारून त्यांचे मुंडके कापून ते मनुस्मृतीमधील श्लोकानुसार काठीवर लटकवले आणि मिरवले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपण आपला कलश उलटा ठेवतो. शंभूराजे हे मराठा बहुजनांचे राजे होते आणि त्यामुळे रागाने त्यांची हत्या ब्राह्मणांनी केली.असा देखील आरोप केल्या जातो. पहिला आरोप आपण पहिला कि ब्राह्मणांनी मनुस्मृती, आठवा अध्याय, श्लोक १२५/१२६नुसार शंभुराजांना ठार केले. पण मात्र त्या श्लोकात, राजाने न्यायदान कसे करावे आणि त्यातील प्रकार, शिक्षा, दंड वगैरे गोष्टीं सांगितल्या आहेत. 
           
                             श्लोक १२५ व १२६ सांगतो कि हि शिक्षा देण्याच्या जागा आहेत, त्या जागा आहेत पोट, हात, पाय, डोळा, कान व सगळं शरीर (१२५). राजाने गुन्ह्याचे गांभीर्य, काळ, वेळ, उद्देश, जागा अशा गोष्टी लक्षात घेऊन शिक्षेचे स्वरूप व अवयव ठरवावे (१२६). आता सांगा यात कुठे लिहिले आहे मुंडके ? आणि त्याला काठीवर लटकावणे ? आणि शिक्षा हि राजाने करायची असते, मग तेव्हा कोणता ब्राह्मण राजा होता ज्याने शंभुराजांना पकडले आणि मारले ? औरंगजेब आपले इस्लामी धर्मगुरू सोडून ब्राह्मणांनी सांगितल्यानुसार का वागेल ? हा विचार तुम्ही केलाय का?  आपण हे जे विचार आहेत न की, शंभुराजांना मारून त्यांचे मुंडके कापून ते काठीवर लटकवले आणि मिरवले आणि त्याचे प्रतीक म्हणून आपण आपला कलश उलटा ठेवतो. हे सगळ आपण चुकीच गृहीत धरतो. आणि बरेच लोक समजतात की, गुढीपाडवा हा सण ब्राह्मणांचा आहे आणि तो सुद्धा शंभुराजांना मारल्याच्या दिवसापासून सुरु झाला. आता अशा गोष्टींवर सुद्धा आपण सहज विश्वास ठेवतो, गुढी पाडवा आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूचा संबंध लावणारे अनेक  संदेश गुढीपाडवा येण्याच्या बरोबर काही दिवस आधी तुमच्या फेसबुक, व्हाट्सअँप आणि अनेक प्रसार माध्यमातून झळकतात आणि आपण अशाच कोणत्याही माहितीला खरी समजून विश्वास ठेवतो आणि मग पुन्हा तुमचा समाज विरुद्ध आमचा समाज अशी निर्लज्ज घोषणा देऊन वाट्टेल तसे वागतो, आणि ज्यांनी आपल्याला एकत्र आणले, एकत्र राहावं म्हणून आपले प्राण दिले त्याच शिवराय व शंभूराजांच्या नावाने एकमेकात फूट पाडून बसतो, शिव – शंभू नावाचा वापर करून स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेतो.

                          आता, तुम्ही हा लेख वाचल्यानंतर म्हणाल की, गुढीवर कलश उलटा का टांगतात ?, किंवा हार , साडी आणि कडुनिंबाचा पाला लावून, मनुष्यस्वरूपी देखावा का तयार केला जातो ? असे प्रश्न तुमच्या मनात तयार होतीलच तर,  मित्रांनो महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली  गेली.दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करू लागले. हा उत्सव महाभारतातील आदिपर्वात वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. याच दिवशी ब्रह्मदेवाने विश्व निर्मिले, असे मानले जाते.
  
                तुमच्या माहितीसाठी सांगते, शिवराय असताना देखील गुढी पाडवा साजरा केला जात होता.  इतिहासाचार्य वि.के.राजवाडे यांनी “मराठ्यांच्या इतिहासाची साधने” या नावाने इतिहासाचे अनेक खंड प्रसिद्ध केले, आणि त्यात देखील अनेक पत्र वगैरे संग्रहित आहेत. त्यातील एका पत्रात गुढी पाडवा या सणाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. या सोबतच एका पत्रात असा उल्लेख आहे कि निराजी पंडित शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक सदस्य होते आणि  ते आपल्या घरी गुढी पाडव्यानिमित्त आल्याचा उल्लेख सापडतो. हे तर आपण पहिले कि शिवरायांच्या काळात गुढी पाडवा साजरा केला जात असे. आता पाहूया कि शिवरायांच्या आधीच्या काळात हा सण होता कि नाही. आपल्या संतांनी देखील गुढी पाडव्याचा उल्लेख अनेक कविता, अभंग इत्यादींमधून केला आहे. “टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांचे पद्य, त्या काळात गुढी पाडवा साजरा होत होता हे दर्शवते.
संत एकनाथ महाराजांच्या भागवत ग्रंथात देखील अनेकवेळा गुढी पाडवा या सणाचा उल्लेख आलेला आहे. एकनाथ महाराज भक्तीची, आनंदाची, यशाची, रामराज्याची, निजधर्माची गुढी उभारावी असे सांगतात. आणि यावरून कळते की, तुकाराम महाराजांना देखील हा सण माहित होता आणि तो साजराही केला जात असे, असे सिद्ध होते. 
   
                मित्रांनो या लेखाद्वारे खरी, खोटी माहीती तुमच्या पुढे मांडली आहे. बघा पटत असेल तर असा चुकीचा विचार करु नका, कारण की, 
आपल्या शंभूराजांनी कधीही जातीचे राजकारण केले नाही, माणसामाणसांत जातीभेद केला नाही. आपल्या शंभू राजाने जात-पात विसरून आपल्याला एकत्र यायला शिकविलं, आपण एकत्र राहावं म्हणून शंभूराजांनी प्राण दिले, शंभूराजे कोण्या एका जमातीचे राजे नाहीत कि कोणत्या ब्राह्मणांचे प्रतिपालक नाहीत. ते रयतेचे राजे आहेत, शंभूराजांचा मृत्यू हा औरंगजेबाने केला हे सत्य आहे आणि ते पुराव्यांसोबत आहे. याला विरोध करून एकच खोटी गोष्ट हजारवेळा बोलून खरी होत नाही.  हे सत्य पोहचवले पाहीजे म्हणूनच हालेख लिहावसा वाटला! तर असो, आपणा सर्वांना गुढी पाडाव्याच्या व हिंदू नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि शंभूराजांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.🌸

_ एकता चौधरी

Tuesday 22 March 2022

पाणि हे नैसर्गिक देणगी.......

  पाणि हे नैसर्गिक देणगी....... 

                         आज २२ मार्च हा दिवस ' जागतिक जल दिन ' म्हणून साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, दैनंदिन जिवन जगत असतांना आपल्याला वेळोवेळी पाण्याची गरज भासत असते. पाण्याशिवाय आपली तहानच जात नाही, आणि एक तर उन्हाळा सुरू आहे म्हटल्यावर वेळोवेळी पाणी हवचं. आपण कुठेही बाहेरगावी जातो तर, आपल्या जवळ छोटीशी पाण्याची बोटल आपण ठेवतोच. आणि पाण्याशिवाय जिवन जगणं मात्र कठिणच. तसेच, सर्व सजीवांनसाठी पाण्याचे महत्व अपरंपार आहे.
            
                        पाणि हे निसर्गाची दिलेली सर्वात महत्वाची देणगी आहे.
आणि त्यातही आपण पाण्याचा भरभक्कम वापर करून ते पाणि वाया घालवितो. आपण प्रत्येक ठिकाणी किंवा आपण आपल्याच घरचं उदाहरण घेऊ या, आपण साधा नळ सुरू असलेला पूर्णपणे बंद करत नाही, नळ बंद केल्यावरपण थोडा सुरूच राहतो, अश्याचं छोट्या- छोट्या बारीक गोष्टिमुळे पाणि वाया घालवितो. ज्यांना पाणि मिळत नाही ह्यांचा विचार केलाय का? आपण कधी....!  कालचं आमच्या सरांनी आम्हाला आदिवासी समाज शिकवितांना प्रश्न केलाय की, तहान म्हणजे काय? तर, त्यांनी सांगितले की, कही लोक रोडवर भटकतात त्यांना आपण ' पारधी ' असे आपल्या भाषेत म्हणतो. त्या लोकांना भुक काय असते त्याचे महत्व कळतेच परंतु त्याच्यासोबतचं पाण्याचे महत्व सुद्धा कळते. हे आपण लक्षात घेतले आहे का कधी....... मुळीच नाहीनं ! ते पाण्यासाठी, अन्नासाठी किती व्याकुळ झालेले असतात. ते लोकं आपण त्यांना पारधी म्हणतो. ते आदिवासी जमाती मधलेच आहे. 

                         आदिवासी जमातीतील लोकं निसर्ग देवतेची पुजा करीत असे. आणि जंगलतोड मुळीच करत नसे. जर एखादं झाड खराब दिसलं की, ते तोडून त्या जागी तेच स्वत: नविन झाड लावत असे. अशाच काही गोष्टी खरंच त्यांनच्या कडून शिकण्यासारख्या आहे.
मित्रांनो, मला पण ह्या बद्दल माहिती नव्हतं, आमच्या सरांनी काल आदिवासी समाजा बद्दल थोडफार सांगितल तर हा भाग मला पाण्याशी, निसर्गाशी संबंधित वाटला म्हणून मी आज हा लेख लिहत असतांना ह्या गोष्टी लक्षात ठेऊन हा लेख लिहला. ह्या सर्व गोष्टीचा संबंध निसर्गापासुन च असतो. पाणी पण निसर्गापासुन च निर्मित असते/आहे. ही एक निसर्गाने दिलेली देणगी आहे. 

                            तर ,आज " जागतिक जल दिन " हा दिवस ' युनाइटेड नेशन ( वाॅटर) UN water ' ही संस्था या दिवसाचे आयोजन करते. 
१९९३ साली प्रथम " जागतिक जल दिन " साजरा करण्यात आला. 
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, पाण्याचा प्रमुख स्त्रोत पाऊस आहे. बर्फ, नदी, तलाव, विहीरी, बोअरवेल हे पाण्याचे दुय्यम स्त्रोत नसून, हे स्त्रोत पावसाच्या पाण्याची वेगवेगळे रूपे आहेत. पावसाचे प्रमाण जेवढे जास्त असेल, तेवढे पाण्याचे प्रमाण जास्त राहील. पाणी ही नैसर्गिक संपत्ति असल्यामुळे  त्यावर मानसाइतकाच इतर, सजीवांचा तेवढाच पुरेपूर हक्क आहे. असे मला वाटते. पाण्याशिवाय माणूस, पशु- पक्षी निर्जीव च आहे.

                        आज, प्राणी-पक्षी देखील पाण्यासाठी भटकंती करतांना दिसतचं आहे. आणि उन्हाळा असल्यामुळे त्यांना तरी कुठे पाणि मिळत असणार! हा विचार तुम्ही केला आहे का? तर मित्रांनो, तुम्ही पण पक्ष्यांनसाठी घरावर थोडसं पाणी ठेवत चला...! भर ऊन्हाळयात पाखरे पाण्याच्या शोधात असतात. तेच पाणी तुम्ही तुमच्या घरावर किंवा अंगणात जरी ठेवलं तीचं पाखरे येऊन, पाणी पिऊन जातील. आणि करता-करता बरेच से पाखरं तुमच्या कडे त्या जागेवर पाण्याच्या शोधात येईल. आणि हे करणं म्हणजे, पुण्यांच काम राहील. जमत असेल तर बघा.........! 
म्हणून च आपण म्हणतो पाणी हेच जीवन.

                            - एकता चौधरी

Friday 18 March 2022

तिचं दु:ख......

दारू पिऊन खेड्यातील बायकोला मारहाण करण्याच व तिच हे सगळं काही सोसण्याच दू:ख मी माझ्या या कवितेत गावठी शब्दात मांडलेल आहे. 
आणि हेच दृश्य अजून पण आढळून येत आहे. 

तिचं दु:ख...... 

आया- बाया म्हणत्यात, 
 तुले कायचं टेंशन नाही, पण 
माया मागं कायचं सु:ख नायी, 
अणं तुले माया मागचं दुख हाय ते दिसत नाही 
तरीबी तु म्हणते तुले कायचं टेंशन नाही, 

नवरा पिऊन येतो, काम त्याले होतं नाही
 दिस-भर मी शेतात लेकरासाठी झुरती 
तरी बी मीचं त्याले खुपती अनं, 
रात्रि पैश्यासाठी मले तो मारती
तरीबी तु मले म्हणते तुले कायचं टेंशन नाही, 

पोरांन ले शाळेत कशी घालु 
हे रायतं टेंशन माया मागं, 
नवरा दारु पिऊन, रोड वर लोयतो 
तरी बी  त्याले मी घरात घेतो, 

म्हणाले- बोलाले त्याले कुणी नाही
नशेत कुणाच्या बापाच ऐकाले तयारं नाही 
तरीबी तु म्हणते तुया मागं कायचं टेंशन नाही,  

माय हे ,
माया मागची कट-कट 
सांगु तरी कुणाले,तरी बी
आया बाया म्हणत्यात तुले कायचं टेंशन नाही,  

सांगत नायी कुणाले,नवरा मले प्याले पैसे माघते, 
कसे दिसं काढले ते मायं मले माहित रायते, 
तरीबी तु म्हणते तुले कायचं टेंशन नाही.

- एकता चौधरी.

Wednesday 16 March 2022

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर / १६ मार्च १६९३

श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर / १६ मार्च १६९३ 
                  
                       16 मार्च  आज मल्हारराव होळकर यांची जयंती.१६ मार्च १६९३ साली मल्हारराव होळकर ह्यांचा जन्म झाला. त्याचं गाव पुणे नजीकचं ‘होळ’. या गावावरून त्यांना होळकर हे नाव मिळालं.  धनगर कुटुंबात जन्मलेले  एक सरदार होते. मल्हारराव होळकर  मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनापती व इंदूर संस्थानचे संस्थापक होते.
दुभती जनावरे आणि मेंढी पालन करणा-या भटक्या धनगर समजातील खंडूजी वीरकर चौगुला यांच्या घरात मुलगा जन्माला आला आणि त्याचे नामकरण मल्हार करण्यात आले. त्यावेळी धनगरी तांडा होळ मुक्कामी होता, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे  कायमचेच राहले.

                       मल्हारराव होळकर शिपाईगिरी करीत असतांना, बाजीराव पेशवे ह्यांच्याशी मैत्री झाली. आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास त्यांना माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. मल्हारराव होळकर  ह्यांच्या चार पत्नी होत्या. १)  भोजराजमामांची मुलगी गौतमी हिच्या बरोबर मल्हाररावांचा विवाह झाला आणि त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. २) द्वारकाबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. द्वारकाबाई आणि मल्हारराव होळकर यांना एक मुलगी होती. ज्यांचे नाव सीताबाई होते. ३) बनाबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. ४) हलकोबाई होळकर या मल्हारराव होळकरांच्या चौथ्या आणि शेवटच्या पत्नी होत्या.
 
                                माधवरावांच्या काळात मल्हारराव होळकर हे माधवरावांनाही वचकून असत. जाटांच्या पारिपत्याकरिता रघुनाथ - रावांबरोबर अलमपूर येथे आले असता तेथेच अतिश्रमाने वृद्धापकाळी मल्हाररावांचे निधन झाले.  मल्हारराव होळकर धाडसी व शूर होते.तर राजकारण आणि राज्यकारभारातही हुशार होते.बाळाजी बाजीराव व त्यानंतरचे पेशवेमाधवराव आणि दादासाहेब मल्हारराव होळकर  यांना पित्यासमान मान देत होते. व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी  उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याच्या कामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदीपर्यंत वाढविल्या.
मराठा साम्राज्याचा उत्तरेचा बुरुज..... मराठा भगवा पताका अटकेपार फडकवणारे श्रीमंत सुभेदार.... इंदौर संस्थानचे अधिपती.... अखंड आयुष्य मराठा साम्राज्याशी निष्ठा ठेवणारे... श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.....💐💐

-एकता चौधरी

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...