Tuesday 22 March 2022

पाणि हे नैसर्गिक देणगी.......

  पाणि हे नैसर्गिक देणगी....... 

                         आज २२ मार्च हा दिवस ' जागतिक जल दिन ' म्हणून साजरा करण्यात येतो. तर मित्रांनो, दैनंदिन जिवन जगत असतांना आपल्याला वेळोवेळी पाण्याची गरज भासत असते. पाण्याशिवाय आपली तहानच जात नाही, आणि एक तर उन्हाळा सुरू आहे म्हटल्यावर वेळोवेळी पाणी हवचं. आपण कुठेही बाहेरगावी जातो तर, आपल्या जवळ छोटीशी पाण्याची बोटल आपण ठेवतोच. आणि पाण्याशिवाय जिवन जगणं मात्र कठिणच. तसेच, सर्व सजीवांनसाठी पाण्याचे महत्व अपरंपार आहे.
            
                        पाणि हे निसर्गाची दिलेली सर्वात महत्वाची देणगी आहे.
आणि त्यातही आपण पाण्याचा भरभक्कम वापर करून ते पाणि वाया घालवितो. आपण प्रत्येक ठिकाणी किंवा आपण आपल्याच घरचं उदाहरण घेऊ या, आपण साधा नळ सुरू असलेला पूर्णपणे बंद करत नाही, नळ बंद केल्यावरपण थोडा सुरूच राहतो, अश्याचं छोट्या- छोट्या बारीक गोष्टिमुळे पाणि वाया घालवितो. ज्यांना पाणि मिळत नाही ह्यांचा विचार केलाय का? आपण कधी....!  कालचं आमच्या सरांनी आम्हाला आदिवासी समाज शिकवितांना प्रश्न केलाय की, तहान म्हणजे काय? तर, त्यांनी सांगितले की, कही लोक रोडवर भटकतात त्यांना आपण ' पारधी ' असे आपल्या भाषेत म्हणतो. त्या लोकांना भुक काय असते त्याचे महत्व कळतेच परंतु त्याच्यासोबतचं पाण्याचे महत्व सुद्धा कळते. हे आपण लक्षात घेतले आहे का कधी....... मुळीच नाहीनं ! ते पाण्यासाठी, अन्नासाठी किती व्याकुळ झालेले असतात. ते लोकं आपण त्यांना पारधी म्हणतो. ते आदिवासी जमाती मधलेच आहे. 

                         आदिवासी जमातीतील लोकं निसर्ग देवतेची पुजा करीत असे. आणि जंगलतोड मुळीच करत नसे. जर एखादं झाड खराब दिसलं की, ते तोडून त्या जागी तेच स्वत: नविन झाड लावत असे. अशाच काही गोष्टी खरंच त्यांनच्या कडून शिकण्यासारख्या आहे.
मित्रांनो, मला पण ह्या बद्दल माहिती नव्हतं, आमच्या सरांनी काल आदिवासी समाजा बद्दल थोडफार सांगितल तर हा भाग मला पाण्याशी, निसर्गाशी संबंधित वाटला म्हणून मी आज हा लेख लिहत असतांना ह्या गोष्टी लक्षात ठेऊन हा लेख लिहला. ह्या सर्व गोष्टीचा संबंध निसर्गापासुन च असतो. पाणी पण निसर्गापासुन च निर्मित असते/आहे. ही एक निसर्गाने दिलेली देणगी आहे. 

                            तर ,आज " जागतिक जल दिन " हा दिवस ' युनाइटेड नेशन ( वाॅटर) UN water ' ही संस्था या दिवसाचे आयोजन करते. 
१९९३ साली प्रथम " जागतिक जल दिन " साजरा करण्यात आला. 
मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, पाण्याचा प्रमुख स्त्रोत पाऊस आहे. बर्फ, नदी, तलाव, विहीरी, बोअरवेल हे पाण्याचे दुय्यम स्त्रोत नसून, हे स्त्रोत पावसाच्या पाण्याची वेगवेगळे रूपे आहेत. पावसाचे प्रमाण जेवढे जास्त असेल, तेवढे पाण्याचे प्रमाण जास्त राहील. पाणी ही नैसर्गिक संपत्ति असल्यामुळे  त्यावर मानसाइतकाच इतर, सजीवांचा तेवढाच पुरेपूर हक्क आहे. असे मला वाटते. पाण्याशिवाय माणूस, पशु- पक्षी निर्जीव च आहे.

                        आज, प्राणी-पक्षी देखील पाण्यासाठी भटकंती करतांना दिसतचं आहे. आणि उन्हाळा असल्यामुळे त्यांना तरी कुठे पाणि मिळत असणार! हा विचार तुम्ही केला आहे का? तर मित्रांनो, तुम्ही पण पक्ष्यांनसाठी घरावर थोडसं पाणी ठेवत चला...! भर ऊन्हाळयात पाखरे पाण्याच्या शोधात असतात. तेच पाणी तुम्ही तुमच्या घरावर किंवा अंगणात जरी ठेवलं तीचं पाखरे येऊन, पाणी पिऊन जातील. आणि करता-करता बरेच से पाखरं तुमच्या कडे त्या जागेवर पाण्याच्या शोधात येईल. आणि हे करणं म्हणजे, पुण्यांच काम राहील. जमत असेल तर बघा.........! 
म्हणून च आपण म्हणतो पाणी हेच जीवन.

                            - एकता चौधरी

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...