दारू पिऊन खेड्यातील बायकोला मारहाण करण्याच व तिच हे सगळं काही सोसण्याच दू:ख मी माझ्या या कवितेत गावठी शब्दात मांडलेल आहे.
तिचं दु:ख......
आया- बाया म्हणत्यात,
तुले कायचं टेंशन नाही, पण
माया मागं कायचं सु:ख नायी,
अणं तुले माया मागचं दुख हाय ते दिसत नाही
तरीबी तु म्हणते तुले कायचं टेंशन नाही,
नवरा पिऊन येतो, काम त्याले होतं नाही
दिस-भर मी शेतात लेकरासाठी झुरती
तरी बी मीचं त्याले खुपती अनं,
रात्रि पैश्यासाठी मले तो मारती
तरीबी तु मले म्हणते तुले कायचं टेंशन नाही,
पोरांन ले शाळेत कशी घालु
हे रायतं टेंशन माया मागं,
नवरा दारु पिऊन, रोड वर लोयतो
तरी बी त्याले मी घरात घेतो,
म्हणाले- बोलाले त्याले कुणी नाही
नशेत कुणाच्या बापाच ऐकाले तयारं नाही
तरीबी तु म्हणते तुया मागं कायचं टेंशन नाही,
माय हे ,
माया मागची कट-कट
सांगु तरी कुणाले,तरी बी
आया बाया म्हणत्यात तुले कायचं टेंशन नाही,
सांगत नायी कुणाले,नवरा मले प्याले पैसे माघते,
कसे दिसं काढले ते मायं मले माहित रायते,
तरीबी तु म्हणते तुले कायचं टेंशन नाही.
- एकता चौधरी.
No comments:
Post a Comment