Thursday 10 March 2022

छत्रपती संभाजी महाराज 11 मार्च 1689

छत्रपती संभाजी महाराज 11 मार्च 1689

                        मित्रांनो आज 11 मार्च, 11 मार्च 1687 रोजी छत्रपती संभाजी राजे ह्यांचे निधन झाले. छत्रपती संभाजी राजे हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.छत्रपती संभाजी राजे ह्यांचे जिवन त्यांच्या  वडिलांप्रमाणे कर्तुत्वनिष्ठित गेलं.
छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ मध्ये पुरंदरच्या किल्ल्यावर झाला आणि महाराष्ट्राला दुसरे छत्रपती लाभले. संभाजी महाराजांना छावा आणि शंभूराजे असे देखील म्हटले जाते. संभाजी राजाच्या जन्मानंतरच दोन वर्षांत त्यांची आई सईबाईंचे निधन झाले.
त्यानंतर संभाजी महाराजांचा सांभाळ शिवाजी महाराजांच्या आईने म्हणजेच संभाजी महाराजांच्या आजी जिजाबाई यांनी केले.
त्यांची दुसरी सावत्र आई सोयराबाई यांनी महाराजांना पोरक्या प्रमाणे वागवले त्यांना नेहमी त्यांचेच मूल पुढे जावं असं वाटायचं म्हणून त्यांनी महाराजांच्या शासकीय कारकिर्दीत देखील खूप वेळा ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला होता. 
महाराजांचे वडील शिवाजी राजे आणि आजी जिजामाता असल्यामुळे लहानपणापासूनच संभाजी महाराजांना लढाईचे प्रशिक्षण दिले.

                             संभाजी महाराज अतिशय हुशार होते. त्यांना संस्कृत आणि आठ इतर भाषा देखील येत होत्या. महाराजांना राजकारण अतिशय लहान वयातच कळायला लागल होता. संभाजीराजांचे लग्न पिलाजीराव यांची कन्या जीवाबाई यांच्याशी झालं.लग्नानंतर मराठी चालीरीती नुसार जीवाबाई यांचे नाव येसूबाई असं ठेवण्यात आलं.
संभाजी महाराज लहानपणी शिवाजी महाराजांच्या सोबत आग्र्याला गेले तेव्हा, ते शिवाजी महाराजांचे दूरचे मंत्री रघुनाथ कोरडे यांच्या दूरच्या नातेवाईकांच्या घरी काही काळ थांबले होते. तिकडे संभाजी महाराज एक ते दीड वर्ष थांबले होते. त्या काळामध्ये महाराज एक ब्राह्मण बालक म्हणून जीवन जगत होते. 
संभाजी महाराजांनी त्यांचे वडील शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ संस्कृत मध्ये बुद्ध चरित्रही लिहिले होते. त्यासोबतच संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ वयाच्या अगदी चौदाव्या वर्षी लिहिला.

                              छत्रपती संभाजी महाराज जे शंभुराजे म्हणून देखील ओळखले जातात.मराठा साम्राज्याचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे औरंगजेब आणि विजापूर आदिलशहा होते.संभाजी महाराजांनी एकूण २१० युद्ध लढली. प्रत्येक युद्धामध्ये ते नेहमीच यशस्वी झाले. म्हणूनच त्यांना शिवबाचा छावा असे देखील म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आता स्वराज्याची जबाबदारी संभाजी महाराजांवर आली होती. 
१६ जानेवारी १६८१ मध्ये महाराज यांचा राज्याभिषेक झाला. 1 फेब्रुवारी, 1689 होते. छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना विदूषक म्हणून परिधान केलेल्या उंट परिधान करून मुघल छावणीत नेण्यात आले. 
छत्रपती संभाजी महाराजांना आपले सर्व किल्ले मोगलांना देण्यास सांगितले गेले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांन समोर अनेक मागण्या ठेवल्या आणि सांगितले की जर ते सहमत झाले तर त्यांचे प्राण वाचले जातील. छत्रपती संभाजी महाराजांना इस्लाम स्वीकारण्यासही भाग पाडले गेले. तेव्हा महाराजांनी हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला. नेमक त्याच वेळी शिवाजी औरंगजेबाच्या कैदेतून सुटून मराठा साम्राज्य स्थापन करण्यात यशस्वी झाले .
       
                        औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्याचार करून ठार मारण्याचा आदेश दिला. सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची जीभ कापल्या गेली. दुसऱ्या दिवशी त्याचे डोळे कापले गेले .  तेव्हा त्यांना सांगण्यात आले की,  जर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला तर त्याचे प्राण वाचले जातील.  परंतु महाराजांनी असे केले नाही. यानंतर, त्याचे सर्व भाग एक एक करून कापले गेले. परंतु संभाजी महाराज झुकले नाहीत. सलग तीन आठवडे त्याच्यावर अशाप्रकारे अत्याचार करण्यात आले. तीन आठवड्यांच्या अशा अत्याचारानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा गळा चिरला गेला. त्यांना फाशी देण्यात आली. त्याचा मृतदेह कुत्र्यांसमोर फेकला गेला. 11 मार्च, 1689 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याचे डोके दख्खनच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये फिरत होते. औरंगजेबाने आपली भीती टिकवण्यासाठी आणि हिंदूंच्या आत्म्याला हादरवण्यासाठी हे केले.  संभाजी महाराजांच्या निधनांनंतर बलदानी छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाने संपूर्ण भारतीय उपखंडात भगवा मराठा ध्वज फडकवला. पुढे जाऊन, बाजीरावांसारख्या महान योद्ध्यांनी हे साम्राज्य यशस्वीपणे चालवले. 

                       महाराजांनचा इतिहास म्हटला की अंगावर काटेच येतात म्हणून तर आज आपल्या मातीसाठी जीवाची पर्वा न करणारे शंभू राजे आजही अनेक लढवय्यांचे श्रद्धस्थान आहेत.
आणि खरच मनातून किती छान वाटत ना की , आपण त्या  महाराष्ट्रात जन्माला आलो जिथे महान व्यक्ती जन्माला येऊन गेल्या, इतिहासाच्या पानावर, राज्य करणारे संभाजी राजे यांच्या स्मृतिस त्रिवार अभिवादन! 💐
      
                                             _एकता चौधरी

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...