Friday 11 March 2022

मुलींच आयुष्य किती वेगळ असतं ना!

मुलींच आयुष्य किती वेगळ असतं ना! 
   
                      मुलगी सासरी गेली की, तिला माहेरच समजल्या जाते. आणि लग्नाआधी माहेरी राहली की, काही शुल्लक कारणांवरून म्हटल्या जाते की तुला सासरी गेल्यावर कळेल! तीला कुठलचं घरदार नसते, लग्नानंतर ती माहेरी आली की तिलाच स्वत:च्या घरी पाहूनीन समजल्या जाते. मुलीला कधी आपल म्हणून वागविल्या जात नाही.
ती चार- चौघात बसली की, तीला घरात जा म्हणून सांगतात. ती जोरात हसली / बोलली की, सासरी नावं ठेवतात असं म्हणतात. ती जास्त बोलली की, अगाऊ आहे असं म्हणतात, थोडसं मनमोकळे पणाने वावरले की म्हणतात, मुलीला वळणचं नाही! अशा प्रकारचे उध्दार मुलींनसाठी वापरले जातात.

                    असचं असत मुलीच जीवन, ज्या कुटूंबात मोठ्ठ व्हायच असतं, तेच कुटूंब तिला सोडून जायच असतं. ज्या बहिणीला भांडून रडवायचं असत, तिलाच सोडून जायच असतं.
दोन घराच दान तिच्या पदरात पडलेलं असतं. तिला एका घरी म्हटल्या जाते ' दिल्या घरी सुखी राहा ' दुसरी वेळ आली की तुझ्या तु घरी जा! तिलाचं माहिती नसतं , नेमकं कुठल तिच घर आहे. सगळी घरातील माणसे आपलीशी करून घेते ती,  पण तिलाच परकं समजल्या जाते. शेवटी ती परक्याची लेक  दुसऱ्याची लक्ष्मी च होते.

                            घरातली बोलकी बाहुली असणारी ती आज लग्नानंतर शाहण्यासारखी वागते,  घरात हक्काने/ जिध्दीपणाने वागणारी ती आता कशाला पण नकोचं म्हणते. माहेरी,  " आई मला भुक लागली जेवायला दे "
म्हणणारी सासरी गेल्यावर सगळयांना वाढून झाल्यावरचं जेवायची सवय करून घेते. आई च्या घरी स्वयंपाक घरात न शिरलेली ती सासरी मात्र ,    'बायको ' म्हणून ती नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते.
असंच जिवन मुलीचं असते! 

                         एकता चौधरी

No comments:

Post a Comment

आयुष्याचं साधन एक पुस्तक.....

आयुष्याचं साधन एक पुस्तक..... जिवनातला दुसरा आरसा म्हणजे पुस्तक आयुष्याच्या प्रवासात,  जग पालटुन टाकणार साधन म्हणजे पुस्तक, आपल्यकडे कसली तक...